|
|
आचार्य अत्र्यांचे किस्से
कार
अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली म्हणून ते पायी-पायीच चालले होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा एक विरोधक भेटला. त्याने खवचटपणे विचारलं,
"काय बाबुराव, आज पायी पायी ? कार विकली की काय ?"
अत्रे म्हणाले,
"अरे, आज तुम्ही एकटेच ? वहिनी नाहीत बरोबर ? कुणाबरोबर पळून-बिळून गेल्या की काय ?"
कामगिरी
स्व. राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांना आठ मुले होती. त्याबद्दल अत्र्यांच्या ’मराठा’ वर्तमानपत्रात बरीच गमतीदार चर्चा होत असे. एकदा अत्र्यांनी, श्री. गिरी, सौ. गिरी व त्यांच्या आठ मुलांचा फोटो ’मराठा’त छापला आणि वर मथळा दिला, "गिरी आणि त्यांची ’काम’गिरी" |
|
You must be logged in to post comments on this site - please either log in or if you are not registered click here to signup | |